Mhatma Gandhi jayanti Speech in marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात महात्मा गांधी जयंती भाषण मराठी या विषयावर भाषण पाहणार आहोत.
या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हे भाषण तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग भाषणाला सुरुवात करुया.
2023 महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mhatma Gandhi jayanti Speech in marathi
भाषणाला सुरवात करण्यापूर्वी या आनंदमयी प्रसंगी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सर्वप्रथम सर्वांना महात्मा गांधी जयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महान व्यक्तींपैकी एक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे एक महान पुरुष होते.
महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८७९ गुजरात मध्ये असलेल्या पोरबंदर या शहरांमध्ये झाला. महात्मा गांधी यांच्या वडिलांचे नाव करमचंद होते तर आईचे नाव पुतळीबाई असे होते. त्यांच्या आजोबांचे नाव हे उत्तमचंद गांधी होते.
महात्मा गांधीजी यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा संपूर्ण देशभरात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो.
महात्मा गांधी यांना लोक प्रेमाने बापू असे म्हणत असत. सुभाषचंद्र बोस यांनी सन १९४४ मध्ये महात्मा गांधी यांना पहिल्यांदा राष्ट्रपिता असे संबोधले होते. महात्मा गांधी यांच्यावर बालपणीच त्यांच्या आईने चांगले संस्कार लावले होते. त्यांचे वडील तत्कालीन काठेवाड प्रांतामधील पोरबंदर येथे दिवाण होते.
महात्मा गांधी जयंती भाषण मराठी
ते पंधरा वर्षांच्या असताना इ. स. १८८५ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. महात्मा गांधी यांच्या वयाच्या १३ व्या वर्षी कस्तूरबा माखनजी कपाडिया यांच्याशी विवाह झाला. त्यांना “बा” असेही म्हटले जात असे.
👉2023 संविधान दिन निबंध भाषण मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
संपूर्ण जग त्यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखते. ते नेहमी पारंपरिक भारतीय पोशाख धोती आणि कापसापासून बनवलेली शाल घालायचे. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षणालाही खूप महत्त्व दिले. त्यांच्या पोरबंदरमधील प्राथमिक तसेच राजकोटमधील माध्यमिक शिक्षणामध्ये ते एक साधारण विद्यार्थी होते.
सन १८८७ मध्ये त्यांनी मॅट्रिक परीक्षा अहमदाबाद हून उत्तीर्ण केली. ते कठोर मेहनती होते शालेय शिक्षण पूर्ण करून ते इ. स. १८८८ मध्ये वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले शिक्षण घेत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या.
इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि जून १८९१ मध्ये ते इंग्लंड सोडून भारतात परत आले. गांधीनी आयुष्याची २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली, जेथे त्यानी त्यांचे राजकीय दृष्टिकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसित केली.
गांधीजींनी त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे दक्षिण आफ्रिकेत कायद्याचा अभ्यास केला. त्यांच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या ज्यातून त्यांना खूप काही शिकायला मिळाले.
इ.स. १९१५मध्ये गांधीजी कायमसाठी भारतात परत आले. जानेवारी १९१५ मध्ये आपल्या लोकांची सेवा करण्याच्या आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या महत्त्वाकांक्षेने भारतात परतले.
सुरुवातीच्या काळात महात्मा गांधीजींनी देशभरातील विविध भागात जाऊन अनेक गोष्टींची माहिती मिळवली. सर्वजण एकत्रित आले तरच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल त्यासाठी गांधीजींनी सर्वांना एकोप्याचे महत्त्व सांगितले व देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वांना एकत्रित आणले.
महात्मा गांधींनी चंपारण चळवळ, खेडा चळवळ, खिलाफत चळवळ, नमक चळवळ आणि भारत छोडो आंदोलन यासह अनेक चळवळी केल्या. या आंदोलनांनी भारतातील ब्रिटीश साम्राज्याचा पाया हादरला आणि आपल्या देशातील लोकांना स्वातंत्र्य चळवळीत एकत्र केले.
९ ऑगस्ट १९४२ मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलन केले. या आंदोलनाचा भारतीय जनतेवर खूप मोठा परिणाम झाला. गांधीजींनी नेहमीच अहिंसेचा मार्ग अवलंबला, लोकांनी अहिंसेचा मार्ग अवलंबावा अशी त्यांची अपेक्षा होती.
Mhatma Gandhi jayanti Speech in marathi
सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा उपयोग करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. गांधीजींनी आयुष्यभर सामाजिक सुधारणेला प्रोत्साहन दिले आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
गांधीजींनी भारत देशाला गुलामीतील मुक्त करण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते. सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा उपयोग करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली.
महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केलेच परंतु त्यासोबत स्वच्छतेलाही तेवढेच महत्त्व दिले. महात्मा गांधी जी स्वच्छतेवर जास्त भर देत असत. आज स्वच्छ भारताची मोहीम महात्मा गांधींच्या नावाने चालवली जात आहे कारण ते खूप स्वच्छता प्रेमी होते.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महात्मा गांधी जयंती निमित्ताने २ ऑक्टोंबर २०१४ साली स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.
३० जानेवारी १९४८ या दिवशी महात्मा गांधीजींचे निधन झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाची सेवा करण्यासाठी घालवले. महात्मा गांधी जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळांमध्ये भाषण स्पर्धा निबंध स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केले जातात.
राष्ट्रीय सण म्हणून गांधी जयंती देशभरात उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींनी मोलाचे कार्य पार पाडले. भारतीय स्वातंत्र्यासाठी गांधीजींचे सर्वात मोठे योगदान आहे. अशा या महान स्वातंत्र्यता सैनिकाला कोटी कोटी नमन…
तर मित्रांनो तुम्हाला “महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mhatma Gandhi jayanti Speech in marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ महात्मा गांधी जयंती भाषण मराठी सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.
या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
धन्यवाद